Posts

Showing posts with the label #chatrapatishivajimaharaj

शिवरायांनी उल्लेखलेली चौऱ्याऐंशी बंदरे आणी अठरा टोपीकर

Image
नमस्कार माझं नाव हितेश आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यसीमा विस्तारत असताना गुजरातमधील सुरत ते कर्नाटकातील बसरूर या दरम्यान एकूण चौर्याऐंशी बंदर असल्याचे माहिती होते तसेच त्याकाळात १८ परकीय व्यापारी स्वराज्याच्या सीमेभोवती घोंगावत होते तर त्या चौर्याऐंशी बंदर व अठरा टोपीकर यांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. मालवण जिंकून स्वराज्यात आल्यावर मालवण किनारी फिरत असता समुद्रात महाराजांना एक बेट दिसले राजांनी त्याचे नाव विचारले तेव्हा त्यास कुरटे म्हणतात असे असे समजले. शिवरायांनी कुरटे बेट पाहून म्हंटले चौऱ्याऐंशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही, इथं बंदरी नूतन जंजिरा वसवावा. चित्रगुप्ताच्या बखरीत सिंधुदुर्गाबद्दल आणि त्याच्या महतीबद्दल अतिशय सुंदर वर्णन केलं आहे – चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन, तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल कि महाराजांना ...