पत्रास कारण कि
प्रति, महाराष्ट्रातील तमाम नागरिक दिनांक- २९/९/२०२५ विषय- शेतकरी राजा कि रंक! महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना माझा नमस्कार. मी कोण?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; मी या राज्यातील एक सामान्य शेतकरी.पत्रास कारण कि, बळीराजा म्हणून माझी ओळख सर्वसाधारणपणे आहे.पण मी राजा आहे कि रंक? असा प्रश्न मला पडलाय. त्याचीच चर्चा आज मला तुमच्यासोबत करायचीय. कारण बरेच जण मी आत्महत्या केली कि त्यामागील कारण समजून न घेता विविध प्रकारे व्यक्त होतात. काही जणांना वाटत मी कर्ज काढून मज्जा करतो मग परतफेड करायची वेळ आली कि नुकसान झाल्याचे कारण सांगून आत्महत्या करतो पण खरं कारण मलाच माहिती आहे. कालपासून तुम्ही बातम्यात एक बातमी वाचली असेल कि मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीय कारण तिथे सतत मुसळधार पाऊस पडतोय. विलास बडे यांच्या सारखे सच्चे पत्रकार आणी काही स्थानिक प्रतिनिधी प्रत्यक्ष पुरात जाऊन पत्रकारिता आणी जनसेवा करतायत. या पुरात आमच्या मका टोमॅटो इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय. आमच्यासाठी पीक म्हणजे आमची लेकरच आहेत आम्ही धरणीला आमची आई मानतो. पाच वर्ष मेहनत करून तळहात...