Posts

Showing posts from August, 2025

गणपतीचा गाऱ्हाणा

“बा देवा गणपती गजानना शिव गौरीच्या तनया रिद्धी सिद्धीच्या दाता! " व्हय महाराजा! सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हा सर्वांनी तुजी स्थापना केलेली असा ती मान्य करून घे महाराजा!  व्हय महाराजा! त्यात काय कमी रव्हली असात तर ती पोटात घे आणी सर्वांका शेतीत आणी कामाधंद्यात यश दे रे महाराजा! व्हय महाराजा! हे अकरा दिवस तुज्या दर्शनाक जे जे भक्तजन येतलंत त्यांका सुख समृद्धी समाधान मिळानदे चाकरमान्यांका नोकरीं व्यवसायात यश दि पोराटोरांका शिक्षणात सुयश दे रे महाराजा!  व्हय महाराजा! हय ता आमच्या साखरप्या चो रसतो कित्येक वर्षा झाली खड्डेमय असा  त्याचा बरोबर मुंबई गोवा हायवे पण काही ठिकाणी भंगलो असत सरकारका तो दुरुस्ती करण्याची सद्बुद्धी दे रस्तो ठीक नाय केल्यानी तर या सरकारवर पटकी येवंदे दे रे महाराजा! व्हय महाराजा! दरवर्षी कोकण रेल्वेने चाकरमानी आरक्षण करान तुज्या सनासाठी येत असतात पण त्यांका तिकिट गावात नाय  ह्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार व्हता त्या काळोबाजार करणार्यांवर पटकी येवंन्दे रे महाराजा! व्हय महाराजा!  आजकाल मराठी माणसाने मराठी बोलना कमी केलेला आसात यामुळे परप्रांरतीय मह...

आजी

नमस्कार माझं नाव हितेश आज मी तुमच्या समोर मी लिहिलेली आजी ही कविता सादर करतोय.                          आजी. आजी म्हणजे आजी म्हणजे आजी असते, तिच्यासारखी प्रेमळ व्यक्ती जगात दुसरी नसते||धृ|| मुलांपेक्षा जीव तिचा नातवंडांवर असतो, त्यांच्यासाठी जीव तिचा तीळ तीळ तूटतो||१ || नातवंडांच्या आजारपणात चिंताग्रस्त असते ती, बालपणीच्या लीला आठवून मंद गोड हसते ती, आजी म्हणजे अनुभवाचा फार मोठा बटवा असतो  किती केला रिता तरी तो संपता संपत नसतो||२|| लांब असतील नातवंड तर आठवणीने व्याकुळ होते, जवळ येताच त्यांच्यावर मायेचा वर्षाव करते, स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करते ती, सर्वांशी मिळून मिसळून हसत खेळत राहते ती||३|| एक वेळ नकळत अचानक अशी येते, लाडकी आजी आपल्याला सोडून दूर निघून  जाते, मागे राहते आठवणींचे न संपणारे पोते||४|| म्हणून म्हणतो आजी-आजोबांना फक्त प्रेम हवं असत, ते गेले देवाघरी तर आपल्या हाती फक्त; रडत बसणं असत,फक्त रडत बसणं असत ||५|| - हितेश. २७-८-२०२५©copyrighted content  लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय  सदर प...